Ad will apear here
Next
ठाण्यातील अभयारण्यांत सात बिबटे
प्रातिनिधिक फोटोठाणे : येऊर, तुंगारेश्वर, कृष्णगिरी उपवन आणि तुलसी या ठाण्यातील चार अभयारण्यांमध्ये सात बिबटे आणि ३९२ चितळे असल्याचे आढळून आले आहे. १० मे रोजी बुद्धपौर्णिमेच्या रात्री प्राणिप्रेमींतर्फे राबवण्यात आलेल्या वन्यजीवगणनेवेळी आढळलेल्या प्राण्यांची आकडेवारी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांनी जाहीर केली आहे. मे महिन्यात ज्या मोजक्या पाणवठ्यांमध्ये पाणी असते, तेथे हमखास प्राणी, पक्षी पाणी पिण्यासाठी येतात. त्यामुळे सर्वाधिक चंद्रप्रकाश असलेल्या रात्री पाणवठ्यांजवळ उभारलेल्या मचाणांवर बसून प्राणिप्रेमी ही गणना करतात.

प्रातिनिधिक फोटोसहायक वनसंरक्षकांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या चार अभयारण्यांमध्ये सात बिबटे, ३९२ चितळे (हरणाचा एक प्रकार), ३७ सांबरे, ३२ रानडुकरे, ८६ लंगूर वानरे, २८ रानकोंबडे, १७४ लालतोंडी माकडे, १२४ वटवाघळे, नऊ रानमांजरे, १९ मुंगसे आणि तीन मोर आहेत. या चार अभयारण्यांमधील ४६ पाणवठ्यांवर ही प्राणिगणना झाली. 

रामदास आठवलेंनी घेतला बिबट्या दत्तक
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक बिबट्या वर्षभरासाठी दत्तक घेतला आहे, अशी माहितीही मोहन नाईकवाडी यांनी दिली. आठवले यांनी या आठ वर्षांच्या या बिबट्याचे भीम असे नामकरण केले असून, त्यासाठी एक लाख २० हजार रुपयांचा डीडी त्यांनी जमा केला आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZKXBC
Similar Posts
प्राणिप्रेमी करणार वन्यजीवगणना ठाणे : प्राणिप्रेमींतर्फे वन्यजीवगणनेचा कार्यक्रम आज, १० मे रोजी ठाण्यात राबवला जाणार आहे. ठाण्यातील येऊर, तुंगारेश्वर अभयारण्य, कृष्णगिरी उपवन आणि तुलसी या अभयारण्यांमध्ये त्यासाठी जवळपास ५० मचाणे उभारण्यात आली आहेत. सोडत पद्धतीने या उपक्रमातील निरीक्षकांची निवड करण्यात येते. आज सायंकाळी पाच वाजल्यापासून
प्राण्यांसाठी केले पाणवठे स्वच्छ ठाणे : वन विभागाने येऊर जंगलातील नैसर्गिक झरे आणि पाणवठे स्वच्छ केल्यामुळे कडाक्याच्या उन्हातही प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. इतक्या भीषण उन्हातही येथील प्राण्यांना उष्णतेच्या झळा जाणवल्याच्या घटनेची कोणतीही नोंद नसल्याची माहिती वन विभागाने दिली. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने,
‘आरपीआय’चा ६१वा वर्धापनदिन सोहळा तीन ऑक्टोबरला मुंबई : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (आरपीआय) ६१वा वर्धापनदिन तीन ऑक्टोबरला ठाण्यातील ढोकाळी येथील हायलँड मैदानात आयोजित करण्यात आला असून, या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या वेळी ‘आरपीआय’च्या कार्यकर्त्यांनी
कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे ‘करू या देशाटन’ या सदराच्या गेल्या भागात आपण ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, अंबरनाथ आदी परिसरातील पर्यटनस्थळे पाहिली. आजच्या भागात पाहू या कल्याण-डोंबिवली परिसरातील पर्यटनस्थळे...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language